वाढदिवस बाळासाहेब थोरात यांचा, पण चर्चा इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाची; म्हणाले….

संगमनेर: बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा 7 फेब्रुवारीला वाढदिवस (Balasaheb Thorat Birthday) होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमनेरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्याच निमित्ताने सायंकाळी इंदुरीकर महाराजांचे (Indurikar Maharaj) किर्तनही आयोजित करण्यात आले होते. या किर्तनात इंदुरीकर महाराजांनी बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल असे काही उद्गार काढले, ज्यांची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

इंदुरीकर महाराजांचे सर्वांनाच परिचित आहे. त्यांच्या विनोदी आणि मुद्द्यावर बोट ठेवणाऱ्या किर्तनामुळे ते देशभर प्रसिद्ध आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या किर्तन कार्यक्रमात बाळासाहेबांचे गोडवे गात इंदुरीकर महाराज म्हणाले, “आजचा कार्यक्रम फक्त थोरात साहेबांवर असलेल्या श्रद्धेमुळे केला. उपस्थित सर्वांचे कौतुक, आपण सगळ्यांनी मिळून त्यांचा शंभरावा वाढदिवस सुद्धा साजरा करूयात. क्षेत्र कोणतेही असो आपला माणूस हा आपला स्वाभिमान असतो. थोरात साहेबांचे एक वाक्य नेहमीच लागू पडते, ते म्हणजे जी दगडं घाव सहन करतात. तीच दगडं मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येतात.  अन् ज्यांच्यामध्ये घाव सहन करण्याची ताकद आहे, त्यांना यश निश्चित मिळत आहे.”

“कोणत्याही दगडाची मूर्ती होत नाही. घाव सहन करणारे दगडचं मूर्तीसाठी वापरले जातात. ज्यांच्यात घाव सहन करण्याची ताकद आहे त्यांना यश निश्चित आहे. जी दगडं घाव सहन करतात तीच दगडं मूर्तीसाठी उपयोगी पडतात, हे वाक्य बाळासाहेब थोरात यांना लागू होतं. क्षेत्र कोणतंही असो, आपला माणूस हा आपला स्वाभिमान असतो,” असंही इंदुरीकर महाराज म्हणाले आहे. इंदुरीकर महाराजांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.