‘Virat Kohli कोणत्याही किंमतीत टी20 वर्ल्ड कपमध्ये पाहिजे’, रोहित शर्माने केले स्पष्ट
Virat Kohli T20 World 2024 : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) टी-20 कारकिर्दीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून शिगेला पोहोचली आहे. टेलिग्राफमधील वृत्तानुसार, विराटच्या जागी युवा खेळाडूंना संधी मिळावी, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. या अहवालानंतर किंग कोहली 2024 चा टी-20 वर्ल्ड कप खेळणार की नाही? याची चिंता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.
मात्र, आता भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू कीर्ती आझादने (Kirti Azad) कोहलीच्या टी-20 कारकिर्दीबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्याने आपल्या ‘एक्स’वर लिहिले की, जेव्हा जय शाहने रोहित शर्माला विराटच्या टी20 विश्वचषकाच्या निवडीबद्दल विचारले तेव्हा हिटमॅनने त्याला स्पष्ट केले की संघाला कोणत्याही किंमतीत कोहलीची गरज आहे.
अजित आगरकरला इतर निवडकर्त्यांशी बोलून विराट कोहलीला टी-20 संघात स्थान मिळत नसल्याचे त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी देण्यात यावी. त्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती.
Why should Jay Shah, he is not a selector, to give responsibility to Ajit Agarkar to talk to the other selectors and convince them that Virat Kohli is not getting a place in the T20 team. For this, time was given till 15th March. If sources are to be believed, Ajit Agarkar was… pic.twitter.com/FyaJSClOLw
— Kirti Azad (@KirtiAzaad) March 17, 2024
सूत्रांवर विश्वास ठेवला तर अजित स्वत:ला किंवा इतर निवडकर्त्यांना पटवून देऊ शकला नाही. जय शाहने रोहितला विचारले, पण रोहित म्हणाला की आम्हाला विराट कोहली कोणत्याही किंमतीत हवा आहे. विराट कोहली टी-20 विश्वचषक खेळणार असून संघ निवडीपूर्वी त्याची अधिकृत घोषणा करेल. मूर्खांनी निवड प्रक्रियेत स्वतःला गुंतवू नये, असे किर्ती आझादने पोस्टमध्ये लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Loksabha Election Dates : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान?
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्या गोष्टींवर बंदी घालण्यात येते? जाणून घ्या सर्वकाही
मनसेतून राजीनामा देऊनही उपयोग झाला नाही, वसंत मोरे यांचं खासदार बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार?