भाजीत मीठ जास्त पडल्यास नका घेऊ टेंशन, ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरुन घालवा भाजीतील खारटपणा

Kitchen Hacks: भाजीत मीठ (Salt) नसेल तर जेवणाला चव येत नाही. पण बरेचदा असे घडते की भाजी बनवताना कल्पना नसल्यामुळे भाजीत जास्त मीठ मिसळले जाते. अशा परिस्थितीत जेवणाची संपूर्ण चवच बिघडते आणि मग लोकांना ते खायलाही आवडत नाही आणि तयार केलेली संपूर्ण भाजी फेकून द्यावी लागते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला भाजीमध्ये जास्त मीठ पडल्यास काय करावे ते सांगणार आहोत. या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही भाजीमध्ये मिठाचे प्रमाण सहज कमी करू शकता.

उकडलेले बटाटे
जर भाजीमध्ये जास्त मीठ पडले असेल तर तुम्ही उकडलेले बटाटे (Boiled Potato) वापरू शकता. खारट झालेल्या भाजीमध्ये तुम्ही जास्त मीठ टाकून ती खाण्यायोग्य बनवू शकता. उकडलेले बटाने भाजीतील जास्त मीठ शोषून घेण्याचे काम करते. त्यानंतर भाजी सर्व्ह करताना बटाटे बाहेर काढू शकता.

लिंबूचा रस
लिंबाची चव आंबट असते. अशा परिस्थितीत जर दाळीच्या भाजीमध्ये मीठ जास्त असेल तर काळजी करण्याची गरज नाही. त्यात लिंबाचा रस घाला, कारण त्याचा आंबटपणा मिठाचे प्रमाण संतुलित करेल.

कणकेचा गोळा
कोणत्याही डाळ किंवा भाजीमध्ये मिठाचे प्रमाण वाढले असेल तर अशा स्थितीत पिठाचे कणीक वापरावे. कणकेचा गोळा मीठ शोषून घेईल. थोड्या वेळाने हे पीठ काढून घ्या. त्यामुळे भाजीची आणि कणकेची दोन्हींची चवही परिपूर्ण होईल.

दही
भाजीमध्ये जास्त मीठ असल्यास तुम्ही दही (Curd) वापरू शकता. यासाठी भाजीत एक किंवा दोन चमचे दही घालून मिक्स करा. दही मीठाचे प्रमाण संतुलित करेल आणि तुमची भाजी पुन्हा चवदार होईल.

देशी तूप
देशी तूपही भाजीत मीठाचे प्रमाण कमी करण्याचे काम करते. मीठासोबत मिरचीही वाढली असेल तर अशा वेळी देसी तूप (Ghee) वापरावे.