कोणत्याही गटाचा शिक्का मारला तरी गद्दार हे गद्दारच : आदित्य ठाकरे

Mumbai – हे घटनाबाह्य दोन लोकांचं सरकार आहे. आदेश घ्यायला दिल्लीत बसलं आहे. स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी त्यांनी हे राजकारण केलं आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.मुंबईतील आग्रीपाडा येथे एका आयोजित कार्यक्रमात त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्याला आज 1 महिना झाला. राग येण्यापेक्षा दुःख वाटतंय. ज्यांना भरभरून दिलं, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही कुणाचं वाईट केलं नाही, म्हणून ताठ मानेनं उभे आहोत, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, असं बरबटलेलं राजकारण पाहून तरुणांना राजकारणात यावंसं वाटेल का? कोणत्याही गटाचा शिक्का मारला तरी गद्दार हे गद्दारच असतात. गद्दार हाच खरा शिक्का.आपण राजकारण करत नाही. आपल्याला राजकारण जमत नाही. त्यामुळे असा दिवस बघावा लागत आहे. नेहमीच राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. मात्र आज आज जे शिवसैनिक भेट आहेत. ते पाहून असं वाटत राजकरणात चांगल्या लोकांना स्थान असतं.