“आत्मचरित्र लिहावं वाटलं तर लिहीन, पण…”, नागराज मंजुळे यांचं लक्षवेधी वक्तव्य

सोलापूर- मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा घर बंदूक बिरयाणी (Ghar Banduk Biryani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या ते व्यस्त आहेत. दरम्यान या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नागराज मंजुळे आज सोलापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी आपल्या आत्मचरित्राबद्दल (Nagraj Manjule On His Biopic) भाष्य केलं.

“स्वत:चं आत्मचरित्र लिहण्याचा सद्या माझा कोणताही विचार नाही. भविष्यात कधी आत्मचरित्र लिहावं वाटलं तर नक्कीच लिहीन. पण फॅन्ड्री आणि सैराट हे सिनेमे एका अर्थानं माझं आत्मचरित्रच आहेत. या सिनेमांमध्ये मी माझं म्हणणं मांडलं आहे. खरं तर माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत काहीही लपलेलं नाही. माझ्याबद्दलच्या सर्वच गोष्टी आता लोकांना माहिती आहे”, असं मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं आहे.