माझ्यावर गुन्हा दाखल करा, वाल्मिकींचे काय? जितेंद्र आव्हाडांचे महंतांना आव्हान

Jitendra Aavhad On ShriRam – माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न सातत्याने करत असतात. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे शिर्डी येथे शिबिर आयोजित केले गेले होते या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उदघाटनावर बोलत असताना एक वादग्रस्त विधान केले आहे.

राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिबिरात बोलत असताना उपस्थित केला.

दरम्यान, या वक्तव्यानंतर आव्हाड यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. मात्र आव्हाड आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.  ज्यांच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो, असे म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली. हे करताना आव्हाडांनी वाल्मिकी रामायणाचा दाखला दिला आहे. मी जे काही बोललो आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. गुन्हा दाखल करायचा असेल, तर करा. मी घाबरत नाही. परंतु ज्यांनी लिहिले आहे, त्या वाल्मिकींचे काय? मग गुन्हा कोणावर दाखल करायचा ते ठरवा, असे आव्हाडांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात