मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील, नाचे कुठले; नितेश राणे यांची टीका

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्या गटातील सेनेला आज मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टात आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दसरा मेळाव्यासाठी नेमकी कुणाला परवानगी मिळावी या मुद्द्या संबंधित याचिकांवर सुनावणी झाली. या सुनावणीत मुंबई महापालिकेचे वकील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) गटाचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांचे वकील आणि ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) यांच्या वकिलांनी आपापल्या पक्षकारांची भूमिका मांडली. तीनही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने शिंदे गटाची मध्यस्थी याचिका फेटाळली.

कोर्टाने सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची हमी घेण्याच्या अटीवरुन उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाने ही लढाई जिंकली. उद्धव ठाकरे यांच्या गटाला परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाईल, अशा चर्चांना उधाण आलंय.

ठाकरेंना परवानगी दिल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टिका-टिप्पणी करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, हा निकाल समोर येताच शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरेंना यानिमित्ताने डिवचले आहे. ते म्हणाले, फक्त मैदानावर सभा घेण्याची परवानगी मिळाली ना..! मला वाटलं तर आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील नाचे कुठले..! अशी टिप्पणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.