‘ना पाणी प्रश्नावर ठोस भूमिका, ना हिंदुत्वावर, फक्त लावंगीच्या फुसक्या माळा’

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर (Marathwada Sanskritik Mandal Maidan) आयोजित सभेत भाजपावर सडकून टीका केली. हिंदुत्व (Hindutva), काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit), बाबरी (Babri), महागाई (Inflation), पाणीप्रश्न (Water Question) आदी मुद्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला. या सभेत उद्धव ठाकरे यांनी ढेकणं चिरडण्यापासून धर्माची अफुची गोळी इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपावर हल्ला चढवला.

उद्धव ठाकरेंच्या सभेतनंतर विरोधकांकडून त्यांना उत्तर दिले जात आहे. मनसेने (MNS) उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका करताना फक्त लावंगीच्या फुसक्या माळा असा टोला लगावला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande) यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. “ना पाणी प्रश्नावर ठोस भूमिका, ना हिंदुत्वावर, ना शहराच्या नामांतरणावर, ना हुंकार फक्त लावंगीच्या फुसक्या माळा,” असा टोला त्यांनी लगावला आहे.