पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रात नव्याने दीडपट अधिक जागा जिंकणार – देवेंद्र फडणवीस 

नाशिक – नाशिक येथे नुकतीच भारतीय जनता पार्टीची(BJP)  प्रदेश पदाधिकारी बैठक पार पडली. या कार्यक्रमातून भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis)ठाकरे गटासह महाविकास आघाडीवर (MVA) जोरदार हल्लाबोल केला आहे. आज जे महाराष्ट्रात सरकार आलंय, ते गद्दारांचं सरकार नसून खुद्दारांचं सरकार आहे. हिंदुत्वासाठी ज्यांची खुद्दारी आहे, ज्यांची विचारांसाठी खुद्दारी आहे असं हे सरकार आहे अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde )  यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं सरकार १०० टक्के कायदेसंमत आहे. ते संविधान संमत आहे. हे सरकार आपला कार्यकाळ तर पूर्ण करणारच आहे. पण पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रात नव्याने दीडपट अधिक जागा जिंकून येणार आहोत. कारण आम्ही जनतेची सेवा आम्ही करत आहोत.” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.