‘पवारांनी महाराष्ट्र लुटला असे ओरडून सांगणारे पंतप्रधान आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत’

नांदेड – शरद पवार (Sharad Pawar) सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळेल असं भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्टींकडून अजित पवारांना सांगण्यात आल्याचा दावा विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार (Opposition leader Vijay Vaddetiwar) यांनी केला आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना वड्डेटीवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) भाजपाच्या सांगण्यावरुन शरद पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही म्हटलं आहे.

2 प्रमुख पक्ष पडूनही भाजपाची परिस्थिती सुधारत नसल्यामुळे अजित दादा हे शरद पवार यांना भेटत आहे. लोकनेतृत्व असलेले शरद पवार यांची गरज भाजपाला आहे. त्यांची मदत मिळाल्याशिवाय लोकसभेतील आकडा वाढू शकत नाही. त्यामुळे अजित दादाच्या शरद पवार यांना भेटत आहे, असं वड्डेटीवार म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना अट घातली आहे की शरद पवार आल्याशिवाय तुम्हाला मुख्यमंत्री होता येणार नाही. म्हणूनच अजितदादा मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांना वारंवार भेटून सोबत येण्यास आग्रह करत आहेत, असं वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.

या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. रयतचे युवा प्रदेशाश्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी देखील याबाबत आझाद मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीने पंतप्रधानाचे उमेदवार म्हणून शरद पवार साहेबांना घोषित करावे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांना करावे. भारतीय जनता पार्टीचा पक्षाचे नाव हे राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी करून टाका, कारण पवारांना नीतिमत्ता, विचारधारा नाही हे जनतेला माहिती आहे आणि मोदी आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा नीतिमत्ता, विचारधारा, त्तत्व शिल्लक राहिली नाही आहेत,यांच्या सगळ्या वर्तणुकीवरून दिसून येते.

पवारांनी महाराष्ट्र लुटला, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असे ओरडून सांगणारे पंतप्रधान आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, राजकारणात लज्जा शिल्लक राहिली नाही आहे. दोघांचा एकच उद्देश आहे तो म्हणजे सत्ता मिळवणे कशाही पद्धतीने..असं म्हणत शिंदे यांनी दोन्ही पक्षांना झोडपून काढले आहे.