साताऱ्यातील सभेत पवारसाहेब भिजले पण शेतकरी विरघळला; राजू शेट्टींनी डागली तोफ 

कोल्हापूर : माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी ( Raju Shetty ) आता महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीत ही घोषणा केली. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

निवडणूक लढवता यावी म्हणून आपण चळवळ उभा केली नाही. तर चळवळ टिकवी म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला असं राजू शेट्टी म्हणाले. सध्या भाजप ( BJP )सोबत जाण्याचा विचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेला नाही असंही ते म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीतून बाहेर पडताच राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना ( Sarad Pawar ) लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आलं होतं असं साताऱ्यातील सभेत शरद पवारसाहेब यांनी भिजत भिजत सांगितलं होतं. पवार साहेब भिजले पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला अशी टीका राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली आहे. मुख्यमंत्री निवडीच्या वेळी सूचक म्हणून मी चालतो मात्र, शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना मला साध विचारलं देखील नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ऊस दर नियंत्रण समितीत शेतीशी काहीही संबंध नसलेले लोक घेतले आहेत, ते आमदाराच्या पुढ्यात बोलणार नाहीत ते कारखानदार यांच्यासमोर काय बोलतील एकरकमी FRP देणे शक्य नाही असा समितीच्या अहवालावरून निती आयोगाने FRP चे तुकडे करण्याबाबत निर्णय घेण्याचं सांगितलं. निती आयोगाने सांगितलेल्या सुचनापेक्षा महाविकास आघाडी सरकारने (MVA Goverment) आणखी कडक भूमिका घेतली आहे असही ते म्हणाले.