पुणे : हॉटेल चालकाने गरम उकळते पाणी टाकून दोन भिकाऱ्यांचा केला निर्दयी खून

पुणे – पुण्यातील सासवड (Saswad) परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेल चालकाने गरम उकळते पाणी टाकून दोन भिकाऱ्यांचा निर्दयी खून केला (The hotel operator brutally murdered two beggars by pouring hot boiling water on them) आहे. पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप (Nilesh Jaywant Jagtap) या अंडाभूर्जी विकणाऱ्या हॉटेल चालकाने कचरा वेचक भिकाऱ्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्या आंगावर उकळते पाणी टाकून त्यांचा खून केला असल्याचा आरोप होत आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार  24मे रोजी सासवडमधील ताथेवाडीच्या कट्ट्यावर 4 कचरावेचक कामगार बसले होते.या चार कामगारांना अंडाभूर्जी विक्रेत्याने या ठिकाणी का बसला? असा प्रश्न विचारत मारहाण केली आणि त्यांच्या अंगावर उकळते पाणीदेखील टाकले. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले होते.

दुर्दैवाने या सगळ्यात 50 आणि 60 वर्षांच्या दोन पुरुषांचा मृत्यू झाला होता आणि साथीदार असलेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या सगळ्या घटनेच्या साक्षीदार असलेल्या लक्ष्मीकांत नाथ्याबा कदम व शेवंताबाई जाधव (Laxmikant Nathyaba Kadam and Shevantabai Jadhav)  यांच्यावरदेखील सध्या उपचार सुरु आहेत.