वडापाव पाहताच तोंडाला पाणी सुटतं! पण दररोज वडापाव खाल्ल्याचे दुष्परिणाम वाचाल तर…

वडापाव (Vada Pav) खायला कोणाला आवडत नाही. खिशाला परवडणारा, भूकेने व्याकूळ पोटाला आराम देणारा, जिभेची चवदार खाण्याची लालसा पूर्ण करणारा खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव. आता वडापाव फक्त मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नाही. देशभरातील प्रत्येक शहरात, गावागावात वडापाव आवडीने खाल्ला जातो. परंतु रोज रोज वडापाव खाणं शरीरासाठी चांगलं नसतं. रोज वडापाव खाल्ल्याने त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. हे दुष्परिणाम सुरुवातीला जरी दिसले नाही तरी हळूहळू ते शरीराला नुकसान पोहोचवतात.

रोज वडापाव खाल्ल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम

रक्तातील शुगर वाढते – पावामधील रिफाईन्ड साखर मेटॅबॉलिझमच्या कार्यावर परिणाम करते. तसेच स्वादूपिंडातून अधिक इन्सुलिन शोषले जाते. त्यामुळे रक्तातील साखर (Blood Sugar) एकाएकी वाढते.

गॅसची समस्या – वडापाव किंवा यासारखे जंकफूडमध्ये लॅक्टोज अधिक असल्याने ब्लोटींगचा त्रास किंवा गॅसची समस्या होण्याचा धोका अधिक असतो. यामधील ग्ल्युटेन असल्याने ते पचायलाही जड असते. पावाचे पदार्थ खाल्ल्याने ते पचायला काही वेळेस तीन दिवसही लागू शकतात.

वजन वाढतं – पावामध्ये अतिप्रमाणात साखर किंवा फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं. यामुळे कॅलरीज वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे नेहमी पावासओबत वडा, समोसा खाण्याची सवय तुम्हांला लठ्ठ बनवू शकते.

पोषणद्रव्यांचा अभाव – पावामधून पोषणद्रव्य मिळण्याची शक्यता कमी असते. पावामधून फायबर, व्हिटॅमिन किंवा मिनरल्स मिळत नाहीत. अधिक हेल्दी बनवण्यासाठी वडापाव किंवा भुर्जीपाव घरीच तयार करा. पावाऐवजी गव्हाचा ब्रेड किंवा मल्टीग्रेन पावासोबत खा.

अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन वाढते – पाव बनवताना त्यामध्ये काही एन्झाईम्स मिसळली जातात. यामुळे पाव अधिक दिवस टिकतो तसेच तो मऊ राहतो. मात्र यामुळे अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शनचा धोका वाढतो.