‘हे’ दोन गुण असणाऱ्या मुलाशी Smriti Mandhana ला करायचंय लग्न, नॅशनल क्रशने सांगितली आवड

Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेटपटू स्म्रीती मंधाना हिचा चाहतावर्ग मोठा आहे. क्रिकेटमध्ये निपुण असण्याबरोबरच स्म्रीती दिसायलाही देखणी आहे. त्यामुळे तिला क्रिकेट विश्वातील नॅशनल क्रश म्हटले जाते. गेल्या काही काळापासून तिचं नाव संगीतकार पलाश मुच्छालशी जोडलं जात आहे. मात्र आयुष्याचा जोडीदार म्हणून कोणत्या व्यक्तीची निवड करणार, याचा खुलासा तिने नुकताच अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती 15’ या शोमध्ये केला.

शोदरम्यान प्रेक्षकांमधील एका तरुणाने स्म्रीतीला प्रश्न विचारला, “तुझे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. भारतातील बहुतांश तरुण मुलं तुला फॉलो करतात. तर मग मला असा प्रश्न विचारायचा आहे की, तुला एका मुलामधले कोणते गुण आवडतात?” हा प्रश्न ऐकताच सूत्रसंचालक बिग बी हसू लागतात आणि त्याला विचारतात, “तुझं लग्न झालं आहे का?” त्यावर तो तरुण म्हणतो, “नाही झालं, म्हणूनच हा प्रश्न विचारला आहे.”

या प्रश्नाचं उत्तर देताना स्म्रीती मंधाना हसत बोलते, “मी अशा प्रश्नाची अपेक्षा केली नव्हती. होय, मुलगा चांगला असावा, ही सर्वांत महत्त्वपूर्ण बाब आहे.” यापुढे ती काही म्हणण्याआधीच अमिताभ बच्चन तिला पुढचा प्रश्न विचारतात, “चांगला असावा म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय?” बिग बींच्या प्रश्नाचं उत्तर देत स्म्रीती म्हणते, “माझ्या मते तो काळजी घेणारा आणि माझ्या खेळाला समजणारा असावा. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे दोन गुण त्या व्यक्तीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण एक मी त्या व्यक्तीला खूप सारा वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे त्याने माझी ही गोष्ट समजणं आणि काळजी घेणं महत्त्वाचं आहे. माझ्या प्राधान्यक्रमात या दोन गोष्टी सर्वांत वर आहेत.”

महत्वाच्या बातम्या-

ठाकरेंनी कोरड्या विहिरीत उडी मारायला लावली तरी मारेन; लोकसभेबाबत अंबादास दानवे स्पष्टच बोलले

शेअर मार्केटमध्ये महिन्याभरात कमावले ६५० कोटी, ‘या’ महिलेची अविश्वसनीय कामगिरी

40 लाखांची साडी आणि 100 कोटींची कार, असे आहे Neeta Ambani यांचे विलासी जीवन