औरंगजेबच्या कबर संदर्भात भारतीय पुरातत्व विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

औरंगाबाद – एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीला (Aurangzeb tomb) भेट दिली. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला असतानाच आता भारतीय पुरातत्व विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

खुलताबाद (Khultabad) येथील औरंगजेब समाधीवर विवाद सुरु असल्यामुळे दिल्ली येथील भारतीय पूरातत्व विभागाने (Archaeological Survey of India) याची गंभीर दखल घेऊन पत्र काढले आहे. यानुसार येत्या पाच दिवसांसाठी औरंगजेब मकबरेचं मुख्यद्वार पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून बुधवार (18 मे) पासून पाच दिवसांसाठी औरंगजेब मकबरेचं मुख्यद्वार पर्यटकांसाठी बंद  (Closed for tourists) करण्यात आला आहे.

आगामी काळात परिस्थिती पाहता आणखी पाच दिवस बंद ठेवली जाऊ शकते असे ही या पत्रात नमूद करण्यात आला आहे.सदरील पत्राची प्रत औरंगजेब मकबरेच्या व्यवस्थापक, पोलीस निरीक्षक, जिल्हाअधिकारी, ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना ही पाठवण्यात आली आहे अशी माहिती भारतीय पूरातत्व विभागाचे अधिकारी राजेश वाकलेकर (Rajesh Vakalekar) यांनी दिली आहे.