Anand Paranjape | संविधान अखंड व अबादीतच राहणार, बदलले जाणार नाही! आनंद परांजपे यांचा विरोधकांना टोला

Anand Paranjape | पंतप्रधान नरेद्र मोदी हेच पुन्हा बहुमताने एनडीए सरकार स्थापन केली करतील, असा विश्वास व्यक्त करत संविधान बदलाचे आरोप धादांत खोटे आणि खोडसाळ आहेत. विरोधी पक्षाकडे मुद्दे नसल्याने संविधान बदलाचा अपप्रचार करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे (Anand Paranjape) यानी केली. राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोणत्याही सरकारला संविधान बदलता येत नाही. असे स्पष्ट करतानाच परांजपे म्हणाले की, आजपर्यंत संविधानाच्या विविध कलमामधे सुमारे 106 वेळा बदल केले आहेत. घटनादुरुस्ती करणारा पहिला बदल 18 जुन 1951 ला तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केला. तर 106 वी घटनादुरुस्ती 28 सप्टेबर 2023 रोजी झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 42 व्या घटनादुरुस्ती करून मुलभूत अधिकारावरचं गदा आणल्याची माहिती देताना परांजपे म्हणाले की, एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात घटनादुरूस्ती करण्याचा प्रकार देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्याची खंत परांजपे यांनी व्यक्त केली.
विरोधकांनी कितीही टीका केली तरी संविधान अबादित आणि अखंड राहणार आहे. त्यामधे कसलाही बदल कोणीही करणार नाही. असा विश्वास आनंद परांजपे यांनी व्यक्त केला.

सुनेत्रा पवार 18 ला उमेदवारी अर्ज भरणार…
बारामती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्राताई पवार 18 एप्रिल रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आनंद परांजपे यांनी यावेळी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब