अंतिम सामन्यात चहलला विकेट मिळवणे आहे अत्यंत आवश्यक, कारण….

मुंबई – आयपीएल 2022 मध्ये पर्पल कॅपची शर्यत खूपच मनोरंजक बनली आहे. ही शर्यत राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वानिंदू हसरंगा यांच्यात आहे. या मोसमात दोन्ही फिरकीपटूंच्या खात्यात 26-26 विकेट जमा आहेत. आता या मोसमात आरसीबीचा प्रवास संपला असून, चहलला अंतिम सामन्यात विकेट घेऊन पर्पल कॅप जिंकण्याची संधी आहे.

या सामन्यात तो विकेट घेऊ शकला नाही तर उत्तम गोलंदाजीच्या सरासरीच्या आधारे वानिंदू हसरंगाच्या डोक्यावर पर्पल कॅप जिंकेल. दुसऱ्या बाजूला जोस बटल धावा करण्याच्या बाबतीत तो इतर फलंदाजांपेक्षा खूप पुढे आहे. बटलरपाठोपाठ लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक यांचा क्रमांक लागतो. या दोन्ही खेळाडूंनी 500 हून अधिक धावा केल्या आहेत. पण एलएसजीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर हे दोन्ही फलंदाज आधीच या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.