हे सरकारचा तोल ढासळल्याचे लक्षण आहे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सरकारवर टीका

Jayant Patil :- शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला टार्गेट केले आहे. चहूबाजूने शेतकरी बांधव संकटात सापडलेला आहे. त्यांना मदत करण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारचा तोल ढासळल्याचे हे लक्षण आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

आपल्या एक्स हँडलवर जयंत पाटील यांनी ही टीका केली आहे. ते म्हणतात, यवतमाळ जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने विधानभवनाच्या प्रवेशद्वारापाशी विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करत असल्याची आर्तता त्याच्या आवाजात होती. दुर्दैव म्हणजे हा सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला गेला. चहूबाजूने शेतकरी बांधव संकटात सापडलेला आहे. त्यांना मदत करण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारचा तोल ढासळल्याचे हे लक्षण आहे.

माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की, हार मानू नका. सत्ताधाऱ्यांना झुकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचे पूजन; पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Sunrisers Hyderabad Full Squad: सनरायझर्स हैदराबाद पूर्ण संघ,यंदा पॅट कमिन्सपासून हे खेळाडू संघाचा भाग बनले