अमरावती लोकसभेची जागा आम्हालाच पाहिजे,नवनीत राणा यांनी…; बच्चू कडू यांचं मोठं विधान
Loksabha Election – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे जोमाने तयारीला लागले असून जागावाटपाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. महायुतीने एका बाजूला राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला असताना दुसऱ्या बाजूला मविआ देखील व्यूहरचना करत आहेत.असे असतानाच अमरावती या लोकसभा मतदार संघावर प्रहारने दावा केला आहे.
अमरावतीची जागा आम्ही मागणार आहोत, असं प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. अमरावतीमधून नवनीत राणा या खासदार आहेत. अशातही तुम्ही अमरावतीच्या जागेवर दावा करणार आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नवनीत राणा यांनी आमच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, असं बच्चू कडू म्हणालेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
अमरावतीची लोकसभेची जागा आम्हाला हवी आहे. हवं तर खासदार नवनीत राणा यांना प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून लढवू. नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार म्हणून प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा लढवू. अकोला, अमरावतीसह लोकसभेच्या तीन जागा आम्हाला हव्या आहेत, असं बच्चू कडू म्हणाले.
‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’
आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन