आदित्य ठाकरेंनी वरळीतून नव्हे तर ठाण्यातून निवडणूक लढवावी – मोहित कंबोज

Mumbai – आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलेल्या एका आव्हानाची चर्चा रंगली आहे. आदित्य ठाकरेंनी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवा, असं खुलं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं आहे. (Resign and contest elections from Worli against me, Aditya Thackeray’s challenge to the Chief Minister).

दरम्यान, यावर आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी उत्तर दिलं आहे.आदित्य ठाकरे हे 2019 ची वरळीतील निवडणूक सचिन अहीर यांच्यामुळे जिंकले होते. त्यामुळे त्यांना इतकाच स्वतःवर विश्वास असेल तर त्यांनी राजीनामा देऊन एकनाथ शिंदेंविरोधात निवडणूक लढवावी, असं कंबोज म्हणाले. आदित्य ठाकरेंचा एकतर्फी विजय दाखवण्यासाठीच सचिन अहीर यांना निवडणुकीआधी शिवसेनेत आणलं गेलं, असंही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान करत आहेत. पण वरळी का? जर आदित्य ठाकरेंना इतकाच विश्वास असेल तर त्यांनी ठाण्यात जावं आणि एकनाथ शिंदेंविरुद्ध निवडणूक लढवावी. असं कंबोज यांनी म्हटले आहे.