तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘या’ तारखेपर्यंत सभासद नोंदणी करण्याचे आवाहन

लातूर :- जिल्हयात सन २०२२-२३ या वर्षात तुती लागवड करणा-या शेतक-यांसाठी सभासद नोंदणी करण्यासाठी महा-रेशीम अभीयान-२०२२ सुरु झालेले असून त्याचा कालावधी हा २५ नोव्हेंबर २०२१ पर्यत आहे. या रेशीम उद्योग योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत कालावधीत शेतकऱ्यांनी रेशीम कार्यालयकडे सभासद नोंदणी फीस रु ५००/- प्रती एकरी भरणा करावी, असे आवाहन रेशीम विकास अधीकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

जिल्ह्यात रेशीम उद्योगास चांगला वाव आहे. तसेच येथील वातावरण देशातील सर्वात जास्त रेशीम उत्पादन असणा-या कर्नाटक राज्याप्रमाणचे असल्याने रेशीम शेतीस वातावरण पुरक आहे. सद्या शेतक-यांना इतर पिकात अतिवृष्टी/दुष्काळाचे होणारे धोके लक्षात घेता जिल्हात ४०६ शेतक-यांनी ४२५ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करुन पारंपारिक पीक पध्दतीस फाटा देत. रेशीम उद्योगाची कास धरली आहे.

सन २०१६-१७ या वर्षापासून रेशीम शेती (उद्योगाचा ) हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात आला आहे. ‘मनरेगा’ योजने अंतर्गत रेशीम उद्योगास १ एकर क्षेत्रावर तुती लागवड व कोष संवर्धन योजनेस शासनाकडुन कुशल व अकूशल स्वरुपात तिन वर्षाकरीता रक्क्म्‍ रु.३.३२ लक्ष अनुदान देय आहे.तसेच नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पा (पोकरा)अंतर्गत रेशीम उद्योगास रक्क्म रु.२.७५ लक्ष अनुदान देय आहे.

रेशीम उद्योग बहूवर्षीक पीक असल्यने एकदा लागवड केल्यानंतर १२ ते १५ वर्षापर्यत पुन्हा-पुन्हा लागवडीचा खर्च येत नाही.त्याच प्रमाणे कोणत्याही प्रकारच्या किटक नाशकाची फवारणी खर्च येत नाही.सदरच्या १ एकर क्षेत्राच्या तुतीच्या पाल्यावर रेशीम किटक संगोपन करुन प्रथम वर्षी ५० ते ६० हजार व दितीय वर्षापासून ३ ते ४ वेळा रेशीम किटकाचे संगोपन करता येत असल्याने त्यापासून १.५० ते २.०० लाखा पर्यत लाभार्थी उत्पादन घेऊ शकतो.

जिल्ह्यात औसा व रेणापूर तालुक्याच्या परिसरातील शेतकरी १५ ते २० वर्षा पासून रेशीम उद्योग करत असून एका महीण्यात रेशीम उद्योगा पासून रु.७५ हजार ते १.०० लाखा पर्यत उत्पादन घेत आहेत. जिल्हाधीकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी रेशीम उद्योग वाढी करीता विशेष लक्ष घातले असून या करीता रेशीम विभाग व कृषी विभाग रेशीम उद्योग वाढीसाठी विशेष पर्यत्न करीत आहेत.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

अंकिता- अभिज्ञाची घायाळ अदा: माधुरी दीक्षितच्या गाण्यावर धरला ठेका

Next Post

तोंडार, हाळी, लोणी, सोमनाथपूर, मादलापूर येथील 48 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेस मंजुरी – बनसोडे

Related Posts

अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीकडून राजकीय संस्कृतीला काळीमा फासला; माधुरी मिसाळ यांचा थेट आरोप

Nagpur – भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत करून घेत असताना राष्ट्रवादी…
Read More

महिला मुख्यमंत्री करायच्या असतील तर रश्मी ठाकरे सज्ज आहेत – सत्तार 

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीतील नेते विविध दावे करत आहेत. यातच आता सुप्रिया सुळे…
Read More
फर्ग्युसन महाविद्यालयात रंगला "फॅशन फिएस्टा 24 शो | Fashion Fiesta 24

फर्ग्युसन महाविद्यालयात रंगला “फॅशन फिएस्टा 24 शो

डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस) च्या फर्ग्युसन कॉलेज (स्वायत्त) द्वारे “फॅशन फिएस्टा 24” या (Fashion Fiesta 24) फॅशन शोचे…
Read More