‘ठाकरे सरकारला वाईनसाठी बैठका घ्यायला वेळ मिळाला मात्र वेदांता साठी वेळ मिळाला नाही’

जळगाव – राज्यात सध्या वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याने आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. वेदांता गुजरातला जाण्यासाठी कोण जबाबदार? यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर शरसंधान करत असताना आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी यावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे.

वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला जाण्यासाठी महाविकास आघाडी (MVA) सरकारच जबाबदार आहे. सरकारने प्रकल्पासाठी वेळ न दिल्याने हा प्रकल्प गुजरातला (Gujarat) गेल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. ठाकरे सरकारला वाईनसाठी बैठक घ्यायला वेळ मिळाला, मात्र या प्रकल्पासाठी वेळ नव्हता असा टोलाही यावेळी महाजन यांनी लगावला आहे.