ऐतिहासिक भिडे वाड्याचे रुपांतर लवकरच राष्ट्रीय स्मारकात होणार, भाजपाकडून साखर वाटून आनंदोत्सव 

पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादा पाटील आणि महायुती सरकारने केलेल्या पाठपुराव्याला यश – हेमंत रासने

Bhide wada – स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उगडून देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाडा येथे पहिली शाळा सुरु केली होती. गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती. परंतु न्यायलयात सुरु असणाऱ्या खटल्यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण झाली होती. आज उच्च न्यायालयाने महापलिका तसेच सरकारच्या बाजूने आपला निकाल दिला आहे. यानंतर भारतीय जनता पार्टी कसबा पेठ(Bharatiya Janata Party Kasba Peth)  विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना कसबा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasane) म्हणाले, आजच्या क्षणाची लाखो नागरिक वाट पाहत होते. देशातील मुलींची पहिली शाळा भिडे वाडा येथे सुरु करण्यात आली होती, न्यायलयाने महापलिका आणि सरकारच्या बाजूने निर्णय दिल्याने आता राष्ट्रीय स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मी चंद्रकांत  पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांचे आभार मानतो, त्यांच्या प्रयत्नांतून आज हा ऐतिहासिक क्षण आपल्या सर्वांच्या वाट्याला आला आहे.

कसबा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र काकडे, नगरसेवक योगेश समेळ ,मनिषा लडकत, संजयमामा देशमुख.  युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक,धनंजय जाधव,  किरण जगदाळे, संदिप लडकत, तुषार रायकर, चंद्रकांत पोटे, प्रणव गंजीवाले, निर्मल हरिहर, सनी पवार जयदिप शिंदे, यशोधन आखाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

भिडेवाड्यातील भाडेकरू संदर्भातील वाद न्यायालयात होता. यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाची भूमिका बजावण्यात आली. भिडे वाड्यातील काही भाडेकरूंनी रोख मोबदला मागितला होता. महापालिकेकडून त्याची तयारी देखील दर्शवण्यात आली होती.  परंतु हा वाद न्यायलयात गेल्याने कामाला विलंब होत गेला. अखेर हा खटला पालिकेने जिंकल्याने भिडे वाड्याचे स्मारक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी पालकमंत्री या नात्याने महत्वपूर्ण असे प्रयत्न केले गेले. राज्य शासनाच्या माध्यमातून देखील सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने हे यश मिळाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा