‘भिडे-सदावर्ते,राणा राज्याचा सन्मान धुळीला मिळवत आहेत आणि आधुनिक पेशवे त्यांना रसद पुरवताहेत’ 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्यांवरून ठाकरे सरकारवर विरोधकांचे हल्ले तीव्र झाले आहेत. काही दिवसांपूर्वी वकील गुणरत्न सदावर्ते ( Advocate Gunaratna Sadavarte ) यांनी देखील सरकारला जेरीस आणले होते. अधूनमधून संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) सुद्धा ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत असतात. यातच आज  राणा दाम्पत्य (Navneet Rana and ravi rana) विरुद्ध शिवसेना (shivsena) यांच्यात दिवसभर राडा पाहायला मिळाला. या संपूर्ण वादावरुन राजकारण ढवळून निघालं.

या वादानंतर अखेर राणा दाम्पत्याला (Navneet Rana and ravi rana) खार पोलिसांनी (Khar Police) अटक केली असून त्यांच्यावर 153 अ हे कलम लावण्यात आलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणे, धर्म, वंश आणि भाषेच्या आधारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि समाजाची शांतता भंग करणे (Disrupting the peace of the society) असे आरोप या कलमांतर्गत करण्यात आले आहेत. उद्या राणा दाम्पत्याला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी भाष्य केले आहे. बुद्धिवंतांचा महाराष्ट्र बाजारबुणग्यांचा कधी झाला? आवरा भिडे-सदावर्तेपासून राणापर्यंत सगळ्या नतद्रष्टांना.राज्याचा सन्मान ते धुळीला मिळवत आहेत आणि आधुनिक पेशवे त्यांना रसद पुरवताहेत! असा दावा त्यांनी केला आहे. या ट्वीटवर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.