इंडिया नाव हटवण्याचा अधिकार कुणालाही नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांची जळगाव येथे पत्रकार परिषद पार पडली.

पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देत पवार साहेबांनी देश पातळीवर सामाजिक आरक्षणाची (Maratha Reservation) मर्यादा 50 टक्के होऊन वाढवून 65 टक्के केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो परंतु तसे केंद्रातलं भाजप सरकार करत नाही असा थेट हल्लाबोल पवार साहेबांनी (Sharad Pawar) केंद्र सरकारवर केला.

आरक्षणासाठी शांतीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर लाठी हल्ला नेमका कोणाच्या आदेशावरून झाला हे सरकारने स्पष्ट करावं अशी ही मागणी पवार साहेबांनी केली.

देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप एका राजकीय सभेतून केले होते व त्या आरोपासंदर्भात केंद्रीय स्तरावरून चौकशीचे आदेश हे पंतप्रधानांनी का दिले नाही अशी विचारणा शरद पवार साहेबांनी केली आहे

भारतीय राज्यघटनेतून इंडिया हे नाव वगळण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नाबाबत पवार साहेबांनी सदर नाव कोणीही बदलू शकणार नाही आणि इंडिया या नावावर केंद्र सरकारला एवढा आक्षेप का याचे उत्तर भाजप सरकारकडून मागितले. मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्व भाजप सरकार अस्वस्थ झाल्याची टीका शरद पवार साहेबांनी केली.

जवळपास 28 वर्षे आधी गोवारी समाजातल्या लोकांच्या मोर्चामध्ये चेंगराचींगरी झाली होती, तत्कालीन सरकारने कुठेही बाळाचा वापर केला नाही आणि संबंधित खात्याच्या मंत्र्याने तातडीने राजीनामा दिला होता याची आठवण पवार साहेबांनी करून दिली व तशी संवेदनशीलता विद्यमान सरकारमध्ये व गृह खात्याच्या मंत्रांमध्ये दिसत नाही.

शासन आपल्या दारी हा शासनाचा उपक्रम लोकांच्या हिताचा कमी आणि प्रसिद्धीचा जास्ती असा टोलाही पवारांनी लगावला. या कार्यक्रमाला जबरदस्तीने लोक आणले जातात आणि सरकारच्या कृतीच्या ऐवजी नेत्यांचाच उदो उदो होतो.

राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झाली आहे त्याच्यावर तातडीचे उपाय सरकारने करणे आवश्यक आहे. जनावरांचा चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याचे टँकर, धरणातील पाणीसाठ्याची नियोजन व किंवा इतर साधनसामुग्रीच्या संदर्भात सरकारने तातडीने नियोजन करावे अशी ही मागणी शरद पवार साहेबांनी केली.

आज काल काही नेते निवडणूक आयोगापेक्षा मोठे झाले आणि परस्पर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाबद्दल व चिन्हा बद्दल न्यायनिवाडा देऊ लागले हे फक्त भाजपच्या राजवटीत होऊ शकतं आणि ही लोक देशाच्या कायद्यापेक्षा मोठी झालीत का असा प्रश्न शरद पवार साहेबांनी केला.

केंद्र शासनाने महिला आरक्षणाचे विधेयक आणल्यास त्याला पक्षाचा पाठिंबा देऊ अशी भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेबांनी मांडली.

सदर पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री सतीश पाटील, माजी मंत्री गुलाब देवकर, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील प्रदेश प्रवक्ते महेश तपासे माजी आमदार विद्याताई चव्हाण युवक अध्यक्ष मेहबूब शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.

https://youtube.com/shorts/2d73CBTUpMo?si=So94Fbm6GkeiHdP4

“मथुरा, वाराणसीसह महत्त्वाची मंदिरे लष्कराच्या ताब्यात द्या”, प्रकाश आंबेडकर यांची मागणी