अवघ्या 5 दिवसांचं तोकडं अधिवेशन’, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

Devendra_Fadnavis

मुंबई – राज्य शासनाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र हे अधिवेशन कमी काळाचं असल्याचं विरोधकांनी टीका केली आहे. आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 4 ते 5 दिवसांचं तोकडं अधिवेशन होणार आहे. पहिला दिवस पुरवणी मागण्यांचा असणार आहे. आमची मागणी होती की अधिवेशनाचा कालावधी वाढवावा. संसदीय कामकाजात ठाकरे सरकारला रस नाही, अधिवेशन टाळण्याचे प्रयत्न ठाकरे सरकारकडून होतो आहे हे स्पष्ट आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अतिशय गंभीर बाब म्हणजे तारांकित, अतारांकित प्रश्नांना गेल्या दोन वर्षात सरकारकडून कोणतीच उत्तरे देण्यात आलेली नाही. एकीकडे अधिवेशन घ्यायचे नाही आणि दुसरीकडे प्रश्नांना उत्तरे सुद्धा द्यायची नाहीत. आता ती उत्तर देण्याचे आता मान्य केले आहे अशी टीका त्यांनी केली.

या अधिवेशनात तरी किमान रोज प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी घेण्याची मागणी आम्ही केली होती. आता ती घेण्याचा निर्णय झाला आहे. सलग दोन अधिवेशन नागपूरला झालेले नाही. त्यामुळे विदर्भात प्रचंड रोष आहे. सद्या मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्याने ते मुंबईत घ्यावे लागते आहे. पण मार्च अधिवेशन नागपूरला घ्यावे, अशी मागणी आम्ही केली आहे. त्यावर निर्णय घेण्याचे मान्य केले आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post
bacchu kadu

आता ‘सो जा बेटे कोरोना आ जायेगा’, असं म्हणण्याची वेळ आली आहे – बच्चू कडू

Next Post

ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

Related Posts
देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावरून नवाब मलिक यांच्यावर ईडी कारवाई करतेय – राष्ट्रवादी

मुंबई   – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत येण्याची घाई लागल्यामुळे केवळ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवाब मलिक…
Read More

मुख्यमंत्र्यांना आता राजीनाम्या शिवाय पर्याय नाही; पाटणकरांवरील कारवाईनंतर नितेश राणे आक्रमक

मुंबई – ईडीनं मोठी कारवाई करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर…
Read More
कृषीमंत्री धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय; बीड येथे कृषी भवन उभारण्यास १४ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर

कृषीमंत्री धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय; बीड येथे कृषी भवन उभारण्यास १४ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर

Dhananjay Munde- राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना कायम सर्वप्रकारची मदत एकाच छताखाली मिळावी…
Read More