”दोन राऊतांवर माझा लई राग हाय… आमचं सगळं वाटोळं केलंय”

Shahaji Patil : शिंदे गटातील (Shinde Faction) आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी दोन राऊतांवर माझा खूप राग आहे. या दोन राऊतांनी आमचे वाटोळे केले, असा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. कोकणातील एका कार्यक्रमात बोलताना शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत (Sanjay Raut) आणि विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

लोकसभेच्या निवडणुकीला कोकणात येऊन धुरळा पाडणार. निलेश राणे तुम्ही येऊ नका म्हणालात तरी मी येणार. संजय राऊत निवडणुकीला उभे राहत नाही, नाहीतर तिथे पण गेलो असतो. राऊतांचा निवडणुकीतील पराभव अटळ आहे, असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, सन १९९५ मध्ये तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख यांचा पराभव केल्यानंतर जेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रसिद्धी सध्या मला महाराष्ट्रभर फिरताना मिळत आहे. ही सर्व देवाची देणगी असून कोकणातील डोंगर ही लय भारी असल्याचे आमदार शहाजी पाटील म्हणालेत.