युती मध्ये जिंकल्या त्यापेक्षा आज अधिक शिवसेनेच्या नगरपंचायती जागा निवडून आल्या; उद्धव ठाकरेंचा दावा

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल पुन्हा भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधताना त्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. दोन महिने उपचारात गेले, लवकरात लवरकर महाराष्ट्र पिंजून काढणार, काळजीवाहू विरोधकांना भगव्याचे तेज दाखवणार अशी गर्जना देखील त्यांनी केली.

भाजपला आपण पोसलं, पण २५ वर्षे युतीत सडली यावर मी ठाम आहे. आम्ही हिंदुत्व नाही सोडले सोडणार नाही भाजपला सोडले भाजप म्हणजे हिंदुत्व सोडले असे नाही. नगरपंचायती सर्व जागा लढवल्या नव्हत्या. आज चार क्रमांक वर असलो तरी आम्ही जागा किती लढवल्या अगदी युती मध्ये जिंकल्या त्यापेक्षा आज अधिक नगरपंचायती जागा निवडून आल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, आपण या निवडणुका गांभीर्याने घ्यायला हवे. इतर वेळा मी पण या निवडणुकीत फिरलो नाही हे टाळायला हवे. ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी. आज आपण गप्प बसलो तर गुलामगिरी येईल. आणीबाणी सदृश परिस्थिती मोडायची असेल तर शिवसैनिकांनी समोर यायला हवे असे देखील ते म्हणाले,