Big Boss 17: अंकिताशी लग्न करणं म्हणजे इन्व्हेस्टमेंट…विकी जैन नेमकं काय म्हणाला?

Ankita Lokhande – Vicky Jain: प्रसिद्ध टीव्ही शो बिग बॉस १७ मध्ये (Big Boss 17) अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे सर्वाधिक चर्चेत राहणारे कपल आहे. या दोघांमध्ये सातत्याने बिग बॉसच्या घरात वाद होत असून दोघांच्या नात्यातील अंतर वाढताना दिसत आहे. अशातच आता विकीने अंकिताशी लग्न करणे एक गुंतवणूक असल्याचे म्हटले आहे, असा दावा या शोमधली स्पर्धक ईशा मालवीय हिनं केला आहे.

एका एपिसोडमध्ये ईशा, मन्नारा चोप्रा आणि सना रईस खान या तिघी बोलत असताना दिसतायत. याच गप्पांमध्ये ईशानं विकीबद्दल एक दावा केला. अंकितासोबत लग्न ही एक इन्व्हेस्टमेंट असल्याचं तो ईशाला म्हणला, असा दावा तिनं केला.

ईशा म्हणाली की, माझ्या आणि विकीचा वाद सुरू होता. तेव्हा मी त्याला विचारलं की, तू नशिबावर किती विश्वास ठेवतो? यावर तो म्हणाला की, माझा नशिबावर अजिबातच विश्वास नाहीये. मी त्याला म्हटलं की, अंकितासोबत तुझं लग्न झालं तो नशिबाचा भाग नाही का? तुला आधीपासूनच माहिती होतं की, अंकितासोबत तुझं लग्न होणार आहे म्हणून. यावर विकी म्हणाला की, हा नशिबाचा भाग नव्हता. माझी गुंतवणूक होती. हे ऐकल्यावर मला धक्काच बसला. विकी पुढं म्हणाला की, तो मुंबईत आला तेव्हा त्यानं काही जणांशी मैत्री केली. त्यातले काही अंकिताचे मित्र होते. त्या मित्रांमुळं आम्ही भेटलो नंतर डेट केलं आणि लग्न झालं. यावर मन्नारा म्हणाली की, तर विकीला सेलिब्रिटी पार्टनर हवा होता.

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार