‘सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली; आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही’

चंद्रकांत पाटील

पुणे – महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली. भारतीय जनता पार्टी ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला.

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाबद्दल त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.चंद्रकांत पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठी एंपिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितले होते, तरीही महाविकास आघाडी सरकारने केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण देऊन ओबीसींची फसवणूक केली. न्यायालयात टिकणार नाही, असा अध्यादेश काढण्याच्या प्रकाराची चौकशी करा. या अध्यादेशामागे कोण आहे, हे स्पष्ट करा. ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळू नये असा महाविकास आघाडी सरकारचा डाव आहे. चुकीचा अध्यादेश काढून ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला.

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी राजकीय आरक्षणासाठी एंपिरिकल डेटाची जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगाला जबाबदारी दिली. माहिती गोळा करण्यासाठी मागास आयोगाने काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तर राज्य सरकारने त्याला निधी आणि आवश्यक संसाधने दिली नाहीत. परिणामी राज्य मागासवर्ग आयोगाचे एंपिरिकल डेटा गोळा करण्याचे काम इंचभरही पुढे गेले नाही. त्यामुळे कंटाळून काही सदस्यांनी राजीनामा दिला.

ते म्हणाले की, २०११ साली केंद्र सरकारने जनगणना करताना गोळा केलेली सामाजिक आर्थिक पाहणीची माहिती आणि सर्वोच्च न्यायालयाने मागितलेला एंपिरिकल डेटा यांचा काही संबंध नाही. केंद्र सरकारवर आरोप करण्यापेक्षा न्यायालयाने जो एंपिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितला आहे त्यावर राज्य सरकारने लक्ष केंद्रित करावे.

Previous Post
रामनाथ कोविंद

शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो – राष्ट्रपती

Next Post
cm

ठाकरे सरकारला न्यायालयाचा दणका; ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती

Related Posts
रक्तदान शिबिर

राणीसावरगाव : श्री दत्तात्रय जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

राणीसावरगाव/विनायक आंधळे – दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री दत्तात्रय जयंती (Shri Dattatraya Jayanti) निमित्त 14 डिसेंबर 2022 रोजी…
Read More
उद्धव ठाकरेंची आता थेट नरेंद्र मोदींना विनंती; म्हणाले, आता तुम्हीच...

उद्धव ठाकरेंची आता थेट नरेंद्र मोदींना विनंती; म्हणाले, आता तुम्हीच…

Mumbai – राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निकाल काल जाहीर झाला. त्यानुसार राज्यातल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या…
Read More
Sharad Pawar | शेतकऱ्यांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, या प्रश्नांकडे वेधले लक्ष

Sharad Pawar | शेतकऱ्यांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, या प्रश्नांकडे वेधले लक्ष

Sharad Pawar | जानाई शिरसाई व पुरंदर उपसासिंचन योजना दुष्काळी भागाला न्याय देणाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. या योजनांच्या…
Read More