राज्यातील जनतेला सुद्धा चिंता आहे की महाराष्ट्राचा बिहार होतो की काय?

मुंबई – राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्ताधारी मंडळींकडून हल्ले करण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना भेटायला आलेले भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला.

खार पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच हा हल्ला झाला आहे. ( Shiv Sena Attack Somaiya Car ) दरम्यान या प्रकरणी सोमय्या यांनी बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb danawe) यांनी औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या यांच्या वर झालेल्या हल्ल्यासंदर्भात भाष्य केले आहे. सध्या महाराष्ट्रात आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे दानवे म्हणाले.

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेल्याने राज्यातील जनतेला सुद्धा चिंता आहे की महाराष्ट्राचा बिहार ( Bihar ) होतो की काय. जगाच्या पाठीवर आपल्या देशाच्या पोलिसांचे नाव आहे. तसेच देशामध्ये महाराष्ट्राच्या पोलिसांचे नाव आहे. पण सत्ताधारी तिन्ही पक्ष पोलिसांना बदनाम करण्याचे काम करत आहे असे मला वाटते. कारण गेल्या एका महिन्याच्या घडामोडींकडे बघितले तर याआधीही पुण्यात सोमय्यांवर हल्ला झाला पण आरोपींवर गुन्हा दाखल झाला नाही. पोलखोल यात्रांवर हल्ले होत आहे. सरकारच्या प्रतिनिधीने राणा दाम्पत्याचे मत वळण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांनी ऐकले असते,असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले.