स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसलेला पक्ष गाडून टाकायचा आहे – उद्धव ठाकरे 

Khed –  २०२४ साली स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसलेला पक्ष गाडून टाकायचा आहे, हा निश्चय करा. नाहीतर २०२४ नंतर आपल्या देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे.

खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त येथील गोळीबार मैदानावर आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या नाही, तर माझ्या वडिलांनी केली. हा सत्तेचा गुलाम झालेला चुना लाव आयोग आहे. भुरटे, गद्दार आणि तोतयांना सांगतोस नाव चोराल, पण शिवसेना चोरू शकत नाही. भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं. ज्यांनी सोबत दिली, त्यांना संपवायला निघाले आहेत. मात्र, त्यांनी प्रयत्न करुन बघावेत, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.