लोकसभेची निवडणूक होईल त्यावेळी महाराष्ट्रात आणि देशात भाजपचा धुव्वा उडणार – मलिक

मुंबई – राज्यातील विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचा अतिशय दारूण पराभव झाला आहे. नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे तर अकोला-वाशिम-बुलढाणा या मतदार संघातून भाजपचेच वसंत खंडेलवाल यांनी मोठा विजय मिळवला आहे.

दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणूका जिंकल्यावर जनता त्यांच्या बाजुने आहे हा भाजपचा भ्रम आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यांनी भाजपला सुनावले आहे. जनतेतून लोकसभेची निवडणूक होईल त्यावेळी महाराष्ट्रात आणि देशात भाजपचा धुव्वा उडणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

शेतकऱ्यांच्या , तरुणांच्या मनात महागाई व बेरोजगारीवरुन भाजप सरकारविषयी रोष आहे. मतविभाजनाचा भाजपने खेळ खेळला तरी आता पहिली टेस्ट असून  येणाऱ्या  आगामी पाच राज्यातील निवडणूकीत पराभव हा होणार आहे हे निश्चित असेही नवाब मलिक म्हणाले.