… तर राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही; भाजप खासदाराचा थेट इशारा

लखनौ – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्या हाती घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. जून महिन्यात राज ठाकरे (raj thackeray ayodhya visit) अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण, राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, त्यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. त्यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी अटच भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह (bjp mp brij bhushan sharan singh) यांनी ठेवली आहे.

राज ठाकरे यांना अयोध्येत यायचं असेल तर त्यांनी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी. माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही असं ब्रिजभूषण म्हणाले आहेत. इतकच नव्हे तर ब्रिजभूषण सिंग यांनी जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची भेट घेऊ नयेत असंही ब्रिजभूषण यांनी म्हटलं आहे.

राम मंदिर आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS), विश्व हिंदू परिषद (VHP) आणि सामान्य लोकांचं योगदान होतं. यात ठाकरे परिवाराचं काहीही घेणंदेणं नव्हतं असंही ब्रिजभूषण यांनी म्हटलं आहे.बृजभूषण सिंह हे कैसरगंजचे भाजपचे खासदार आहे. त्यांनी ट्वीट करून ‘राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांचा वेळोवेळी अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी हात जोडून माफी मागावी मगच अयोध्येला यावे’ असं म्हटलं आहे.