उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली – सरदेसाई 

 उस्मानाबाद :उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली असल्याचा  अजब दावा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केला आहे. शिवसेनेनं दोन सेक्युलर पक्षांना सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना अनेक चांगले निर्णय घेतल, असंही ते म्हणाले.  वरुण सरदेसाई हे उस्मानाबादमध्ये युवा सेनेच्या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

‘उद्धव ठाकरे यांच्या करोना काळातील कामाची दखल सगळ्यांनी घेतली. ते कट्टर हिंदुत्ववादी असताना देखील त्यांनी दोन सेक्युलर पक्षांना सोबत घेऊन मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. उद्या त्यांची लोकप्रियता अशीच वाढत राहिली तर २०२४ ला ते पंतप्रधानपदाचे दावेदार बनू शकतील, या भीतीनेच भाजपने शिवसेना फोडण्याचे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार घालवण्याचे काम केलं,’ असा दावा वरुण सरदेसाई यांनी केला.