आम्हाला विवाहित न राहता एक कुटुंब बनून राहायचे होते; आमिरसोबतच्या घटस्फोटावर kiran raoने तोडले मौन

आमिर खान आणि किरण राव (Kiran Rao) हे बी-टाउनच्या काही माजी जोडप्यांपैकी एक आहेत, ज्यांचे विभक्त झाल्यानंतरही एकमेकांशी चांगले नाते आहे. 2021 मध्ये दोघांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले. विभक्त झाल्यानंतर आमिर खान आणि किरण राव (Kiran Rao) केवळ त्यांचा मुलगा आझादला एकत्र वाढवत नाहीत, तर त्यांच्या व्यावसायिक जीवनातही समतोल साधत आहेत. त्यांचा आगामी ‘लापता लेडीज’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत किरणने आमिरसोबतच्या घटस्फोटावर आपले मौन तोडले.

किरण रावचे आमिरसोबतचे नाते कसे आहे?
घटस्फोटानंतर आमिर खानसोबतच्या बाँडिंगबद्दल कनेक्ट एफएम कॅनडाशी संवाद साधताना किरण राव म्हणाली, “हे आमच्यासाठी स्वाभाविकपणे आले, कारण आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली. पार्टनर बनल्यानंतरही आम्ही काम करत राहिलो. वैवाहिक नातेसंबंधाच्या पलीकडे, आम्ही एकमेकांना समजतो. आम्ही सर्जनशीलपणे एकमेकांच्या जवळ आहोत. अनेक मुद्द्यांवर आमची मते सारखीच आहेत.”

किरणचे आमिर खानसोबतचे नाते संपले नाही
किरण राव पुढे म्हणाली, “आमचे खूप कौटुंबिक आणि प्रामाणिक नाते होते. हे असे काहीतरी आहे जे तुम्ही पुसून टाकू शकत नाही आणि तुम्हाला ते करायचे नाही, कारण हाच आमच्या नात्याचा आधार आहे. आम्हा दोघांमध्ये कधीही जोरदार वाद झाला नाही. आम्हाला फक्त आमचे नाते पुन्हा परिभाषित करायचे होते. आम्हाला विवाहित न राहता एक कुटुंब बनून राहायचे होते, पण लग्न करुन नाही. म्हणून आम्ही आमचे स्वतःचे नियम बनवले.”

महत्वाच्या बातम्या

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!