LokSabha Election 2024 | नेते मंडळींच्या नाराजीने वरिष्ठ हैराण; मनधरणी करण्यात जातोय वेळ 

लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election 2024)निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडी अशी राज्यात लढत होत असून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नाराजांची मनधरणी करण्यसाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडत आहेत.

यातच आता  हिंगोलीतील शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिकीट कापलं गेल्याचं दु:ख असल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर भावना गवळीही तिकीट नाकारल्याने नाराज असल्याचं ते म्हणाले. तर ही स्क्रीप्ट संजय राठोड आणि मदन येरावार यांनी लिहिल्याचा आरोपही त्यांनी केला.

दुसऱ्या बाजूला राज्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून (Bhiwandi Constituency) वरिष्ठांच्या आदेशानुसार, मैत्रीपूर्ण लढत देणार किंवा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी लढणार असल्याची भूमिका काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापुरात भाजप पदाधिका-यांचा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात (LokSabha Election 2024) येणा-या इंदापूर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोलचा हा प्रयत्न मानला जातोय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत