सुरेंद्रनगर प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करा –  रामदास आठवले

मुंबई  – गुजरात च्या सुरेंद्र नगर मधील चुडा तालुक्यातील समढीयाल गावातील दलितांची शेतजमीन बळकावणाऱ्या गावातील सवर्ण आरोपींनी येथील आलजीभाई परमार आणि मंजिभाई परमार यांच्यावर तलवारी काठीने जोरदार हल्ला करून त्यांची हत्या केली परमार कुटुंबातील महिलांना जबर जखमी केले. या निर्घृण हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण तीव्र निषेधकरीत असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

याप्रकरणी सुरेंद्र नगर जिल्हा पोलीस अधिक्षकांशी ना.रामदास आठवले यांनी चर्चा करून केलेल्या कारवाईची माहिती घेतली तसेच सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केलीपोलिसांनी या गुन्ह्यातील11 आरोपीना अटक केली असल्याची माहिती दिली. स्थानिक  रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते सुरेंद्र नगर मधील दलित कुटुंबासोबत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समढीयाल  गावात तळ ठोकून आहेत. तसेच गुजरात चे समाज कल्याण मंत्री समढीयाल गावाला भेट देऊन गेले आहेत अशी माहिती रिपाइं चे गुजरात राज्य अध्यक्ष अशोककुमार भट्टी यांनी दिली आहे.

या गुन्ह्यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करा; सर्व आरोपींना अटक करावी आणि हल्ल्यात बळी गेलेल्या दलितांच्याय कुटुंबियांना गुजरात शासनाने सांत्वनपर मदत करावी आणि त्यांच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. याप्रकरणाची महिती मिळताच रामदास आठवले यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.