Ramdas Athawale | पोकळ घोषणा देणाऱ्या काँग्रेस आघाडीला पराभूत करा;आठवलेंचे पुदुचेरीत आवाहन

Ramdas Athawale | काँग्रेस सत्तेत असताना मागील अनेक वर्षांत काँग्रेस ने देशाच्या विकासासाठी ठोस काही केले नाही.सत्तेत असताना काही काम न करता केवळ घोषणा केल्या आणि आता विरोधी पक्ष म्हणून जनतेला भुलविण्याठी केलेल्या घोषणा पत्रात केवळ पोकळ घोषणा केल्या आहेत.पोकळ घोषणा करणाऱ्या काँग्रेस आणि काँगेस च्या इंडिया आघाडीला पराभूत करा असे आवाहन करून देशाचा विकास करताना गावा गावाचा आणि शेवटच्या व्यक्तीचा विचार करणारे प्रधान मंत्री नरेंद्र मोदीच देशासमोर सक्षम पर्याय आहेत. मोदींशिवाय देशासमोर कोणताही सक्षम पर्याय नाही असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले.

पुदूचेरी येथील रॉयल पार्क सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या (Republican Party) कार्यकर्ता बैठकीत ना. रामदास आठवलेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी पुदुचेरी चे भाजप चे लोकसभा उमेदवार नमो शिवयम यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा ना. रामदास आठवलेंनी जाहीर केला.यावेळी रिपाइं चे पुदुचेरी चे प्रदेश अध्यक्ष ज्ञानमुर्ती; रिपाइं चे तामिळनाडू चे प्रदेश अध्यक्ष फादर एम ए सुसाई आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदूचेरीत भाजप आणि रं गास्वामी काँग्रेस पक्षाची युती आहे.या युतीचे पुदुचेरित सरकार असून त्यात रांगास्वामी काँग्रेस चे 5 आणि भाजप चे 2 मंत्री आहेत.एकूण 7 मंत्री असलेले पुदूचेरित राज्य सरकार आहे.त्यातील गृहमंत्री असणारे नमो शिवायम हे भाजप चे आमदार असून त्यांनाच भाजप ने लोकसभा निवडणुकीत पुदुचेरीची उमेदवारी दिली आहे.भाजप उमेदवार नमो शीवायम यांना ना. रामदास आठवलेंनी रिपब्लीकन पक्षाचा पाठिंबा जाहीर केला असून त्यांच्या प्रचारासाठी रिपाइं कार्यकर्त्यांची संयुक्त बैठकीला ही ना. आठवलेंनी मार्गदर्शन केले.

मागील 10 वर्षांच्या काळात भारत देशाला विविध क्षेत्रात पुढे नेण्याचे काम प्रधानमंत्री मोदींनी केले आहे. चंद्रयान सारखी मोहीम यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देत त्यांच्या पाठीशी सर्व शक्तिनिशी उभे राहणारे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी आपले नेतृत्व सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे.देश सर्व क्षेत्रात मोदींमुळे पुढे जात असल्याने रिपब्लिकन पक्षाने मोदींच्या नेतृत्वातील भाजप एन डी ए ला पाठींबा दिला आहे.दक्षिण भारतात ही मोदींना जनतेचे समर्थन वाढत आहे. देशभर 80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य सरकार द्वारे वाटप करण्याचा निर्णय घेणाऱ्या मोदींना सर्व समाज घटकांची काळजी आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे नरेंद्र मोदी हेच या लोकसभा निवडणुकीत देशासमोर प्रधानमंत्री म्हणून सक्षम पर्याय आहेत असे ना. रामदास आठवले म्हणाले. दरम्यान रामदास आठवले यांनी पूदुचेरी दौऱ्यात पुदुचेरी चे मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांची सदिच्छा भेट घेतली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | आम्हाला पडणारं मतदान निश्चित आहे; मोहोळांबाबत धीरज घाटेंनी व्यक्त केला विश्वास

Shirur LokSabha 2024 | शिरूर लोकसभा मतदारसंघात कुणाचे पारडे जड? राजकीय गणितं काय ?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘बूथ विजय अभियान’, प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार