अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर संग्राम थोपटे यांनी केली आपली भूमिका जाहीर, म्हणाले….

Sangram Thopate: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्या पराभवाची स्वप्ने पाहणाऱ्या कॉंग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. हा धक्का केवळ कॉंग्रेसला नव्हे तर महाविकास आघाडीलादेखील धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यामुळेपक्षाची गळती थांबविण्याचे मोठे आव्हान आता कॉंग्रेस समोर असणार आहे.

आधी मिलिंद देवरा नंतर बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण यांसारेख पक्षातील दिग्गज नेते एकामागोमाग पक्षातून बाहेर पडल्याने काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. काल अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची हायकमांडसोबत चर्चाही झाली. डॅमेज कंट्रोल करण्याकरीता कालपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे आमदारांशी संपर्क साधत आहेत.

या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने मलाही मोठा धक्का बसला असून मी व माझे कुटुंबीय काँग्रेस पक्षाबरोबरच आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही असं मत भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया