रिपाइंची सोबत असताना भाजपने मनसेशी युती करू नये – रामदास आठवले

रिपाइंची सोबत असताना भाजपने मनसेशी युती करू नये – रामदास आठवले

पुणे : ‘आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भक्कम साथ आहे. ‘रिपाइं’ची सोबत असताना भाजपने राज ठाकरे यांच्या नादाला लागून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करू नये. राज ठाकरे सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेत असल्याने भाजपाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे भाजपने मनसेच्या सोबत जाणे योग्य होणार नाही,’ असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला दिला.

दरम्यान, जनधन, उज्वला आणि मुद्रा योजनाअंतर्गत मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा झाला आहे. आवास योजनेत अनेकांना पक्की घरे मिळाली आहेत. आयुष्यमान भारत योजनेत सव्वा दोन लाखाच्या वर लोकांना लाभ झाला आहे. जात-धर्म न पाहता नरेंद्र मोदी यांनी या योजना सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अस देखील आठवले म्हणाले आहेत.

तर, जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. त्यातून जातीभेद वाढणार नाही, तर ज्या जाती अधिक मागास आहेत, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे सोयीचे होणार आहे. दलितांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यांना आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=5wWKfxFFi5c

Previous Post
आत्ता रेस्टॉरंट बारा वाजेपर्यंत तर इतर दुकाने अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार

आत्ता रेस्टॉरंट बारा वाजेपर्यंत तर इतर दुकाने अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार

Next Post
भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना घेऊ नका, जय शहांशी चर्चा करणार – आठवले

भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना घेऊ नका, जय शहांशी चर्चा करणार – आठवले

Related Posts

‘महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि शिवसेना अनिल परब यांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे’

मुंबई – शिवसेना नेते अनिल परब (Shiv Sena leader Anil Parab) यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) धाड…
Read More
Sharad Pawar : 'छत्रपती शिवरायांच्या भूमीवर अशी घटना...', बदलापूर प्रकरणावरून शरद पवारांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला

Sharad Pawar : ‘छत्रपती शिवरायांच्या भूमीवर अशी घटना…’, बदलापूर प्रकरणावरून शरद पवारांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला

Sharad Pawar :– बदलापूर (Badlapur Case) येथील शाळेत केजीमध्ये शिकणाऱ्या दोन मुलींच्या कथित लैंगिक छळाच्या घटनेने देशातील महाराष्ट्राची…
Read More
uddhav thackeray

हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, घालावं आणि सोडावं, बाबरी पाडली तेव्हा बिळात होतात – ठाकरे 

 मुंबई – मुंबईत ‘बेस्ट’ बसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे (National Common Mobility Card)  लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (…
Read More