मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला – नाना पटोले

nana patole

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला असून शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, कामगारविरोधी धोरण, बेरोजगारांच्या विरोधातील धोरण, गरिबांच्याविरोधातील धोरणांना विरोध करण्यासाठी ही लढाई आहे. सामान्य जनतेला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहिल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाने सक्रीय भाग घेतला. अकोल्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी रिक्षा चालवली

प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, तीन कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी आंदोलन करत असून एका वर्षापासून हे आंदोलन सुरुच आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत. कृषी कायदे, कामगार कायद्यात बदल करुन शेतकरी, कामगारांना भांडवलदारांचे गुलाम बनवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. मोदी सरकराच्या काळात फक्त दोन चार उद्योगपती मित्रांचा फायदा होत असून १३० कोटी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत परंतु मोदी सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाही.

हे वाचलंत का ? 

Previous Post
shivendraraje

एफआरपीनुसार संपुर्ण रक्कम देणारा ‘अजिंक्यतारा’ पहिला कारखाना

Next Post
bhendi

भेंडी पिकातून लाखोंचं उत्पादन घ्यायचंय ? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे…

Related Posts
Chanakya Niti: खरी जीवनसाथी कशी ओळखावी? चाणक्यांच्या या गोष्टी करतील मदत

Chanakya Niti: खरी जीवनसाथी कशी ओळखावी? चाणक्यांच्या या गोष्टी करतील मदत

Chanakya Niti: कलियुगात खरा आणि चांगला जोडीदार ओळखणे फार कठीण आहे. अनेक वेळा माणसे न तपासता लोकांशी मैत्री…
Read More
stock market

या 6 शेअर्सना बजेटमधून बुस्टर मिळू शकतो, 3-4 महिन्यांत 23% पर्यंत परतावा मिळण्याचा अंदाज

Pre Budget 2023 Stock Picks : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी सामान्य अर्थसंकल्प…
Read More
Amol Mitkari Sharad Pawar

अमोल  मिटकरी याांनी ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागितली तरच पवारांना भेटू आणि चर्चा करू – परशुराम सेवा संघ

पुणे –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार (NCP President Sharad Pawar)  यांनी ब्राह्मण संघटनांना (Brahmin Association)  भेटायता…
Read More