शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंना जीवे मारण्याची धमक्या आल्या होत्या, नितेश राणेंचा गौप्यस्फोट

Mumbai – विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यसाठी प्रसिद्ध असणारे भाजप आमदार नितेश राणे यांनी एक नवं ट्विट केलं आहे. त्यातून त्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ज्यावेळी नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती असा दावा त्यांनी ट्विटमध्ये केला आहे.

एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा पुरवू नका अशी सुचना दिल्याचा त्याच्यावरती आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणेंच्या ट्विटच्या माध्यमातून केलेल्या या दाव्याची  जोरात चर्चा सुरु झाली आहे. तसेच त्यांनी पुढे ट्विटमध्ये माऊ माऊ संपू दे…मग आपण व्याजासह वस्त्रहरण सुरु करु असा आशय लिहिला आहे.