‘राज साहेबांचं लेक्चर प्रभावशाली; संपूर्ण राष्ट्रवादी अघोषित प्रवक्त्यांसकट कामाला लागली’

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला. सोबतच राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे वाभाडे काढले.

यावेळी बोलताना त्यांनी  जातीवादाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात जातीवाद फोफावला असा आरोप शरद पवारांवर गंभीर आरोप केला. दरम्यान, राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला धुतल्यानंतर आता महाविकास आघातील तमाम नेते मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर तुटून पडले आहेत. राष्ट्रवादीवर झालेल्या आरोपांना शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ते एखादे व्याख्यान देतात आणि चार सहा महिने निघून जातात. कूठे असतात. काेणाला माहित नसते. त्यांच्या ताेंडाला काेणी लगाम लावू शकत नाही असा टाेलाही पवारांनी मारला.

यानंतर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात धर्मांध राजकारण करू पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आज आणखी एक मनोरंजन करणारा मित्रपक्ष मिळाला. असं म्हणत ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे.

दरम्यान, शरद पवार आणि अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेचा समाचार मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष आशिष देवधर यांनी घेतला आहे. आझाद मराठीशी बोलताना ते म्हणाले, पवार साहेब म्हणतात राजसाहेब ३-४ महिन्यांनी लेक्चर देतात आणि मग भुमिगत होतात..३-४ महिन्यांनी एकदाच लेक्चर दिल्यावर संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष व इतर पक्षातील अघोषित प्रवक्त्यां सकट कामाला लागत असेल तर ते लेक्चर किती जबरदस्त प्रभावी प्रभावशाली आणि परिणामकारक ठरले आहे हे वेगळं सांगायला पाहिजे का ? जाती पातीचे बीज रुजवणारे हेच प्रवक्ते सध्या अशेच निरर्थक नाहीतर हास्यास्पद विधान करून आपली एकनिष्ठता दाखवण्याचे केविलवाणे प्रकार करत असतात..त्यामुळे अशांकडून वेगळं काही अपेक्षित नाही. असं देखील ते म्हणाले.