Rohit Pawar | भाजप घाबरलीय,केजरीवाल यांच्यासोबत महाराष्ट्राचीही स्वाभिमानी मराठी जनता

Rohit Pawar | दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक केली आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, मद्य धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये 338 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती. तसंच, त्यांना चौकशीकरता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. तब्बल ९ वेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, प्रत्येकवेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं. यामुळे त्यांना अटक होणार अशी शक्यता वर्तवली जात होती.

दरम्यान, या मुद्द्याचे आता राजकीय पडसाद उमटू लागले असून सत्ताधारी भाजप आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. या अटकेनंतर आता रोहित पवार (Rohit Pawar) भडकले आहेत. ते म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल यांची अटक ही अहंकाराचा कहर आहे…. आज ही परिस्थिती असेल तर चुकून २०२४ ला भाजप सत्तेत आली तर संविधान आणि लोकशाही हे सर्वांना विसरावं लागेल…या काळात मा. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत महाराष्ट्राचीही स्वाभिमानी मराठी जनता आहे… या कारवाईवरुन मात्र एक स्पष्ट झालं की, भाजप घाबरलीय!. अशी टीका पवारांनी केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर, पुण्यात धंगेकर तर कोल्हापूरातून या नावाला पसंती

LokSabha Election 2024 | ‘अजितदादा जे बोलले ते पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते’

Jitendra Awad | माझ्या डोळ्यात साहेबांसंदर्भात आदर आणि प्रेम असल्याने मनातून अश्रू येतात