”महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात येणार म्हणून डुप्लिकेट वाघ घाबरले”, शीतल म्हात्रेंचा हल्ला

Aditya Thackeray :  छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजलखानाचा वध करताना जी वाघनखं (Wagh Nakhe) वापरली ती वाघनखं महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. येत्या 16 नोव्हेंबरला ही वाघ नखं मुंबईत दाखल होतील. पण ही वाघनखं शिवरायांची नाहीतच असा दावा काही मंडळी करत आहेत.

दरम्यान, लंडनहून राज्यात आणण्यात येणारी वाघनखे शिवरायांनी वापरलेली आहेत की नाही? यावरच आमदार आदित्य ठाकरेंनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत येणार असे आम्हाला सांगण्यात आले आहे. ती महाराजांची वाघनखे आहेत असा दावा केला आहे. हा आमच्या भावनांचा प्रश्न आहे त्यामुळे नक्की ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेलीच आहेत का की शिवकालीन आहेत हे स्पष्ट केले पाहिजे.

वाघनखे, कोथळा हे शब्द वापरुन आयुष्यभर राजकारण केलंत आणि आता महाराजांच्या वाघनखांवर संशय घेणारी यांची मुघलांची जात… औरंगजेबाची कबर सजवली.. तिला संरक्षण दिलं हे यांच्याच सरकारने. हिंदुत्वाच्या नावावर मतांचं राजकारण करायचं आणि सरकारमध्ये आल्यावर मुघलांसारखं वागायचं हीच यांची नीती!! असो… छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात येणार म्हणून डुप्लिकेट वाघ घाबरले वाटतं…, असं ट्वीट शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केलं आहे.

https://www.youtube.com/shorts/QFN9YvQY9dg

महत्वाच्या बातम्या-

World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!

नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन

Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण