ऋतुजा लटके यांनी नियमानुसार तीन ऑक्टोबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला, मात्र..; राऊतांची टीका

Mumbai – अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll 2022) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात ही निवडणूक भाजपऐवजी (BJP) शिंदे गट (CM Eknath Shinde) लढण्याची शक्यता आहे. यातच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत.

यातच आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी नियमानुसार तीन ऑक्टोबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला. नियमानुसार एक महिन्याचा पगार देखील महापालिकेत जमा केला. मात्र ऋतुजा लटके यांना आम्ही उमेदवारी देऊ नये, यासाठी शिंदे सरकारकडून महापालिका आयुक्तांवर दबाव आणला गेला, मी याचा निषेध करतो असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.