‘संभाजीनगरसह देशात भाजप पुरस्कृत दंगली, आमची सभा होऊ नये म्हणून  तणाव निर्माण करण्यात आला’

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या राड्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. येत्या 2 तारखेला संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. ही सभा होऊ नये म्हणूच संभाजीनगरात तणाव निर्माण करण्यात आला आहे, असा आरोप करतानाच संभाजीनगरसह देशात ज्या दंगली झाल्या त्या भाजप पुरस्कृत होत्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची शेवटची धडपड सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि सभेला परावनगी नाकारायची यासाठी हे सगळं केल जात असल्याचे राऊत म्हणाले.यापूर्वी रामनवमी दिवशी कधी हल्ले झाले नव्हते. सध्या शिवसेनेच्या खेड, मालेगावमधील सभेला जो प्रतिसाद मिळत आहे ते पाहिल्यावर काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकरली आहे. त्यांनतर काही लोकांना हाताशी धरुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राऊत म्हणाले.