‘मुख्यमंत्री जनतेच्या 1 नंबर पसंतीला आहेत, ही जनतेने दिलेली शाबासकीच म्हणावी लागेल’

'मुख्यमंत्री जनतेच्या 1 नंबर पसंतीला आहेत, ही जनतेने दिलेली शाबासकीच म्हणावी लागेल'

पुणे – भाजपला राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण होत असून सरकारच्या कामगिरीबाबत महाविकास आघाडीतील नेते समाधान व्यक्त करत आहेत तर विरोधीपक्षातील नेत्यांनी ठाकरे सरकारची पोलखोल सुरु केली आहे.

वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, तिन्ही पक्षातील धुसफूस,महिला सुरक्षा आदी मुद्द्यांवर म्हणावी तेवढी चांगली कामगिरी सरकारला करता आली नसल्याची टीका विरोधक करत आहेत. तर कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या कामगिरीचा दाखला देत महाविकास आघाडीतील नेते स्वतःच्या सरकारचा बचाव करताना दिसून येत आहेत.

दरम्यान, सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता शिवसेनेचे खडकवासला विधानसभा मतदार संघ विभाग प्रमुख महेश पोकळे यांनी सरकारच्या वाटचालीबाबत आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला आज यशस्वी 2 वर्षे पूर्ण झाली या 2 वर्षात सरकारने सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. कोरनाचे संकट, वादळ, पूर परिस्तिथी असे कित्येक संकटांना खंबीरपणे सामोरे जाऊन सर्वांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. तसेच लसीकरणामध्ये देखील महाराष्ट्र अव्वल ठरला आहे आणि मुख्यमंत्री देखील जनतेच्या 1 नंबर पसंतीला आहेत. ही जनतेने दिलेली शाबासकीच म्हणावी लागेल असं पोकळे यांनी म्हटले आहे.

Previous Post
'सत्ता टिकवण्यासाठी सत्ताधारी संघर्ष करत आहेत तर सरकारचे लचके तोडण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत'

‘सत्ता टिकवण्यासाठी सत्ताधारी संघर्ष करत आहेत तर सरकारचे लचके तोडण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत’

Next Post
‘एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता’

‘एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता’

Related Posts
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर हायकोर्टाचे तिखट प्रश्न, विचारले, 'तुम्ही डोक्यात गोळी मारता का?'

अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर हायकोर्टाचे तिखट प्रश्न, विचारले, ‘तुम्ही डोक्यात गोळी मारता का?’

बदलापूर लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी ( Akshay Shinde Encounter) मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली…
Read More

वर्षातून दोन वेळा आयपीएलचे आयोजन करा; रवी शास्त्रींनी केली अजब मागणी

मुंबई – भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुचवले आहे की T20 फॉरमॅटमधील द्विपक्षीय मालिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये…
Read More
keshav upadhye

कालपर्यंत जे ‘बाप चोरला’ म्हणून रडत होते, तेच आज मात्र बापालाच नाकारत आहेत – उपाध्ये

Mumbai – निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर, आता उद्धव ठाकरे (Uddhav…
Read More