वडिलांच्या गंभीर आरोपांमुळे संतापला रवींद्र जडेजा; म्हणाला, ‘माझ्या पत्नीची बदनामी करू नका…’

Ravindra Jadeja vs Father Controversy : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा मोठ्या वादात सापडला आहे. जडेजाच्या वडिलांनी एका मुलाखतीत मुलगा आणि सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. या दोघांमध्ये गेल्या 5 वर्षांपासून कोणताही होत नसून ते बऱ्याच दिवसांपासून वेगळे राहत असल्याचा आरोप भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांनी केला आहे. एवढेच नाही तर वडिलांनी रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिच्यावरही आरोप केले आहेत. आता याप्रकरणी जडेजाने मौन तोडले असून हे आरोप चुकीचे आणि एकतर्फी असल्याचे वक्तव्य केले आहे.

रवींद्रचे वडील अनिरुद्ध सिंग जडेजा (Ravindra Jadeja) यांनी एका गुजराती वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपला मुलगा आणि सुनेवर खळबळजनक आरोप केले आहेत. 2016 मध्ये रिवाबासोबत लग्न झाल्यानंतर त्यांचा मुलगा पूर्णपणे बदलला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी रवींद्रची पत्नी रिवाबा हिच्यावर आरोप केला की लग्नाच्या 2-3 महिन्यांनंतर तिने सर्व संपत्ती तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. रवींद्र आणि त्याची पत्नी कुटुंबापासून वेगळे राहतात आणि त्यांच्याशी बोलतही नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

आरोपांमुळे जडेजा नाराज
ही मुलाखत समोर आल्यापासून खळबळ उडाली असून आता जडेजाने याप्रकरणी आपली बाजू मांडली आहे. वडिलांच्या आरोपामुळे संतप्त झालेल्या जडेजाने गुजरातीमध्ये आपले वक्तव्य जारी केले आणि मुलाखतीला ‘स्क्रिप्टेड’ म्हटले आणि त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ